Posts

Showing posts from May, 2018

पाथरवट मॅट्रिमोनी च्या यशाची घोडदौड सुरूच

Image
💑 वर न. 29. राहुल अशोकराव फुणगे आणि वधू नं. 31. कांचन गोरखनाथ वारघडे यांचा नुकताच वाङ्निश्चय संपन्न झालाय.. मॅट्रिमोनीचे हे यश समाजातील सर्वांच्या विश्वास आणि प्रतिसादा शिवाय शक्य नाही...! आपली साथ अशीच राहू द्या..!!

कपड्यांचा आहेर - एक मूर्खपणा

Image
    कपड्यांचा आहेर - एक मुर्खपणा          साधारण एका गरीब घरचं लग्न म्हटलं तरी किमान आहेरात मोडल्या जाणाऱ्या साड्या ह्या दीडशेच्या आसपास लागतातच. ही आहेरात दिली जाणारी साडी शे-दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास असते. त्याची गुणवत्ता महत्वाची नसते फक्त एक परंपरा म्हणून समाजाच्या बोकांडी बसवुन ती साडी वाटली जाते किंवा वाटायला भाग पाडली जाते. बरं ही आहेराची साडी एखाद्या स्रीला चुकुन जर लग्नाच्या मंडपात देण्यात आली नाही तर त्या संबंधित वरमायला ती ही तशीच तिच्या कार्यात जशास तसा म्हणून तिला टोमणा मारुन धडा देते. हे मानपान सन्मान इतके पागंतात की वधु वराला कोणी खाक मानत नाही. हा लग्न नावाचा धडाकेबाज event नेमका कोणासाठी असतो हा मात्रा संशोधनाचा विषय आहे. बरं मानापानावरून लटकणारे ह्यांचे चमकीदार नाक.. आहेराची साडी मिळाली म्हणून काय घरी वापरणार ? नाही ती as it is दुसऱ्या पाहुण्यांच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात आहेर म्हणुनच forward केली जाईल किंवा त्या साडीला भांड्यावाल्याला देऊन प्लास्टीकचे डबे, मग्गे, बकेटी घेणे किंवा पापड, कुर्डया, शेवया, वाळत घालण्यासा...

आपण कुठे चाललो आहोत..?

Image
👉 आपण कधी विचार करणार आहोत की नाही..? सध्या लग्नसराई जोरात आहे. कारण नसताना एकमेकांची स्पर्धा करून ज्याची क्षमता नाही तोही कर्ज काढून थाटामाटात लग्न करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळीकडेच सुरू आहे पण आम्ही अनेक अतिशय चुकीच्या पध्दती सुरू केल्यात, त्यात संस्कृती परंपरा जपण्याऐवजी उध्वस्त होत आहे. 👉 पत्रिका नव्हे हँडविल.. घरातील लग्न कार्य गावकी, भावकी व नातेवाईक आणि जवळच्या मित्र मंङळीसाठी असते. ज्या पुढा-यांची, नेत्यांची आपली साधी ओळखही नाही त्यांची आपण नावे टाकतो आणि त्यांनी याव यासाठी अतिआग्रह करत बसतो. पत्रिकांचे आम्ही हॅन्ङवील करून बसलोत. पैसा आहे म्हणून लाखो रू. यावर खर्च करतो आहोत. कधी पत्रिकेत जेवढी नावे तेवढीही माणसे लग्नात नसतात हे कटु सत्य आहे. 👉 वेळेची अवेळ राष्ट्राचे नुकसान करणारी जगातले प्रगत देश आपल्या प्रत्येक कृतीला राष्ट्रहिताचे दृष्टीने महत्व देतात. आम्ही फक्त आमचेच हित पाहतो. लग्नासाठी हजार लोक येवून बसलेले आणि दहावीस पोर मिरवणुकीत नाचत बसतात. त्यातली निम्मी शुध्दीत नसतात.ती एक तास लग्न लेट करतात.आणि तरीही निवेदक (आपले पाकीट नीट मिळावे म्हणून) एकसारखे स्वाग...

विनंती

सप्रेम नमस्कार       पाथरवट मॅट्रिमोनी मधे नांव नोंदविलेल्या सर्व वधू/वारांना विनंती आपण ब्लॉग वर नांव नोंदवून जो विश्वास दाखवला त्या बद्दल आभारी आहोत. ब्लॉगचा आपणांस लाभ झाल्यास आम्हाला तसेच इतरांनाही नक्की सांगा. तसेच आपला विवाह जमल्यास मला तसे कळवा म्हणजे आपले नांव ब्लॉग मधून काढता येईल; त्यामुळे इतरांना आपला विवाह जमल्याची माहिती होईल आणि आपणांसही त्रास होणार नाही. आपला विवाह कुणाबरोबर, कुठे जमला नक्की कळवा, पत्रिका पाठवा. आम्हाला आनंदच होईल. ब्लॉगमधूनच जमल्यास अधिकच आनंद होईल...! (नांव नोंदवले नंतर विवाह जमल्यावर ते कमी करणे ही पण आपली जबाबदारीच आहे.) धन्यवाद...! संजय धानके